Posts

Showing posts from 2020

याजसाठी केला होता अट्टाहास

Image
🍃🍃🍃अभंग🍃🍃🍃 याजसाठी केला होता अट्टाहास। सेवटीचा दिस गोड व्हावा ।।१।। आत्ता निश्चितीने पावलो विसावा । खुंटलीये धावा तृष्णेचिया ।।२।। कवतुक वाटे जालिया वेचाचे । नाव मंगळाचे तेणे गुणे ।।३।। तुका म्हणे मुक्ती परिणीली नोवरी । आता दिवस चारी खेळीमेळी ।।४।। 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 आयुष्यातील शेवटचे दिवस चांगले जावेत, अंतकाळी ईश्वराच्या चिंतनात काळ सुखाने जावा यासाठीच सर्व खटाटोप केला होता. १. आता निश्चयाने मी निष्काळजी होऊन विश्रांतीचे सुख घेत आहे. या पुढे तृष्णेचि धावाधाव होणार नाही. २. त्या श्रीहरीच्या नामस्मरणात व चिंतनात आतापर्यंत आयुष्य खर्च झाले याचेच मोठे कवतुक वाटते श्रीहरीच्या मंगल नामस्मरणाचाच हा गुण आहे. ३. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी मुक्ती हीच नवरी स्वीकारून तिच्याशी लग्न केले आहे. आता यापुढेचे चार दिवस, उरलेले थोडे दिवस मी तिच्याशी क्रीडा करण्यात घालवणार आहे. ४. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

घनु वाजे घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा...

Image
🌾🌾🌾🌾🌾 अभंग 🌾🌾🌾🌾🌾 घनु वाजे घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा । भवतारकु हा कान्हा । वेगी भेटवा कां ॥ १ ॥ चांदवो वो चांदणे । चापेवो चंदनु । देवकी नंदनु । विण नावडे वो ॥ २ ॥ चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी । कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा गा ॥ ३ ॥ सुमनाची सेज । सीतळ वो निकी । पोळी आगीसारिखी । वेगीं विझवा गा ॥ ४ ॥ तुम्ही गातसां सुस्वरे । ऐकोनि द्यावी उत्तरे । कोकिळें वर्जावें । तुम्ही बाइयांनो ॥ ५ ॥ दर्पणी पाहातां । रुप न दिसे वो आपुलें । बापरखुमादेविवर विठ्ठलें । मज ऐसे केलें ॥ ६ ॥ 🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹 वरील अभंगातही माउली विरहाग्नीच्या दाहाचे वर्णन करीत म्हणत आहे: ‘ढगांचा गडगडाट आणि त्याच्या बरोबर थंडगार वाऱ्याची झुळूक जाणविली, (आणि ज्याप्रमाणे अशा वातावरणात मयूराला मयूरीची तीव्र ओढ वाटते त्याचप्रमाणे मला वाटून) आता मला या जगाचे सर्वदुःख हरण करणारा कान्हा लवकर भेटवा. ।।१।। या देवकीनंदन गोपाळाविण मला ना रात्रीचे चांदणे शीतल वाटत आहे ना चंदनाचा लेप. ।।२।। चंदनाची चोळी करुन मला घातली तरी माझे सर्व अंग जळल्यासारखे होत आहे. तो दाह आता सहवेनासा ह...

भक्त ऐसे जाणा जे देही उदास..

Image
🍃🍃🍃अभंग🍃🍃🍃 भक्त ऐसे जाणा जे देही उदास । गेले आशापाश निवरूनी ।।१।। विषय तो त्याचा झाला नारायण । नावडे धन जन माता पिता ।।२।। निर्वाणी गोविंद असे मागे पुढे । काहीच साकडे पडो नेदी ।।३।। तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य । घातलीय भये नर्कां जाणे ।।४।। 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 जे देह भावाविषयी उदास झाले आहेत व ज्यांचे आशापाश नष्ट झाले आहेत त्यांनाच ईश्वराचे भक्त समजावे. १ त्यांना नारायण हाच एक विषय झालेला असून धन जन माता पिता असा लौकिक आवडेनासा होतो.२. अशा भक्तांच्या संकट प्रसंगी त्यांना सांभाळणारा गोविंद त्यांच्या मागे पुढे सांभाळीत असतो. तो त्यांना काहीच संकटे पडू देत नाही.३. तुकाराम महाराज म्हणतात, चांगल्या कार्याला सर्वांनी साह्य करावे, याविषयी कुणी भय घालेल तर तो नरकातच जाईल.४. 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

अनुभवे अनुभव अवघाची साधिला..

Image
🍃🍃🍃अभंग🍃🍃🍃 अनुभवे अनुभव अवघाची साधिला । तरी स्थिरावला मनु ठायी ।।१।। पिटुनिया मुसे आला अळकार । दग्ध ते असार होऊनिया ।।२।। एकचि उरले कायावाचामना । आनंद भुवनामाजी त्रयी ।।३।। तुका म्हणे जिंकीला संसार । होऊनि किंकर विठोबाचे ।।४।। 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 अनुभव घेता घेता आम्ही ईश्वरप्राप्तीचा उच्च प्रकारचा अनुभव मिळविला या अनुभवाने आमचे मन त्याच्या पायी आता स्थिर झाले आहे. १. चुलीमध्ये सोने घातल्यावर ते आटले व त्यातील हिणकस भाग जळून नष्ट झाला व उरलेल्या शुद्ध सोन्याचा अलंकार घडवण्यात आला.२. त्याप्रमाणे कायावाचामनेकरून सर्वत्र एकच आनंद सर्व त्रिभुवनात उरलेला आहे. ३. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या विठोबाचे दास झालो असून त्या योगे सर्व संसार जिंकला आहे.४. 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

आनंद नारायण

Image
श्री नारायण महाराज जालवणकर (त्रिविक्रमाचार्य) श्री नारायण महाराज जालवणकर जन्म:   झाशीजवळ जालवण येथे देशस्थ ऋग्वेदी कुटुंबात वडिल:   तात्या पुराणिक कार्यकाळ:  १८०७ - १८६७       संप्रदाय:  साहसागर गुरु:  गोवर्धनबाबा मधुरा हटयोगी (वय वर्षे ३५०) विशेष:  सन्यासानंतरचे नांव त्रिविक्रमाचार्य शिष्य:  नारायण बाबा रत्नागिरी सखाराम बाबा कल्याण राधाकृष्ण तोरणे - मुंबई लक्ष्मण बाबा - इंदूर जन्म व पार्श्वभुमी  झांशीजवळ जालवण गावी श्री तात्या पुराणिक नावाचे सदाचरणी देशस्थ ब्राह्मण राहात होते. त्यांच्या पत्नी सुद्धा अतिशय सुशील होत्या. जालवणच्या राजाकडून तात्यांना पुराणे वाचनाचे ८००रु. चे उत्पन्न मिळत असे. तेही वार्षिक; पण संसार सुखाने चालू होता. मात्र त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती. एकदा त्यांच्या पत्नी सूर्यनारायणाची पूजा करीत होत्या. त्यावेळी एक योगी आले होते आणि त्यांना विचारू लागले, की “बाई तू हे काय करीत आहेस?” त्या म्हणाल्या, “मी सूर्यनारायणाची पूजा करीत आहे.” तेव्हा योगीराज म्हणतात. तुझ्या घरी पुत्ररूपाने न...

नीचपण बरवे देवा

Image
             अभंगवाणी नीचपण बरवे देवा । न चले कोणाचाही दावा ।। महापुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे राहाती ।। येता सिंधूच्या लहरी । नम्र होता जाती वरी ।। तुका म्हणे कळ । पाय धरिल्या न चले बळ ।। हे देवा, लहानपण, हलकेपणच मला फार चांगले वाटते. कारण लहानपणाचा कुणीही मत्सर करीत नाही, कुणी हेवा दावा साधित नाही. ।।१।। पाहा ना, नदीला महापूर आला तर मोठमोठी झाडे वाहून जातात, मोडून पडतात; पण नम्रपणाने पाण्याखाली वाकणारे लव्हाळ्याचे गवत मात्र वाचते. ।।२।। सागराच्या मोठमोठ्या लाटा जरी उसळल्या तरी त्याच्या पुढे नम्र होतात त्या त्याच्या पाठीवरून जातील व त्यांच्या जिविताचे रक्षण होईल. ।।३।। तुकाराम महाराज म्हणतात सर्वात खाली असणारे पाय मनोभावे धरल्यास मोठ मोठ्या बलवान मानसाचेही मग काही चालत नाही, असे नम्र होण्यातील वर्म आहे. ।।४।।