Posts

Showing posts with the label प्रदिप तोकडे

एकाएकीं आतां असावेंसें वाटे।

Image
🚩🕉️‼️श्री विठ्ठल‼️🕉️🚩     💦🌺 अभंग 🌺💦 एकाएकीं आतां असावेंसें वाटे। तरिच हे खोटे चाळे केले।।१।। वाजवूनि तोंड घातलें बाहेरी। कुल्प करूनी दारीं माजी वसा।।२।। उजेडाचा केला दाटोनि अंधार। सवें हुद्देदार चेष्टविला।।३।। तुका म्हणे भय होतें तोंचि वरी। होती कांही उरी स्वामिसेवा।।४।। 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷      भावार्थ.. हे देवा, आतां तुम्हांला एकटे असावेंसें वाटतें म्हणूनच तुम्ही हा फसविण्याचा खोटा मार्ग स्वीकारला.      देव निराकार आहे असें तुम्हीं आपले वेदमुखानें सांगून आम्हांला सगुण कल्पनेच्या बाहेर घालविलें आणि मायेचें कुलूप दारास लावून तुम्ही आंत लपून बसतां.      तुमचे घरांत ज्ञानदीपाचा प्रकाश होता तो तुम्ही मुद्दाम घालवून अज्ञान अंधकार पाडला व आमचे बरोबर (संसारी जीवांबरोबर संतरूपी हुद्देदार किंवा) वेद हा हुद्देदार व्यवहार करावयास लावला, विधिनिषेधाचे नियम करते झालां. तुकाराम महाराज म्हणतात, तुमचें आमचें स्वामिसेवकपणाचें नातें जोंपर्यंत होतें तोंपर्यंत आम्हीं तुमचें भय धरलें (आतां तुम्हीं-आम्हीं एकरूप झाल्यानंतर भयाचें कार...

देखावे चरण विठोबाचे ।

Image
अविनाश क्षेत्र पंढरी सर्वथा । आणीक ती वार्ता न ये मना ।।१।। सर्व तीर्थ मार्ग विधियुक्त आहे । येथें उभा पाहे पांडुरंग ।।२।। आटणी दाटणी मुंडणी सर्वथा । नाहीं पै तत्वतां यया तीर्था ।।३।। करावें तें स्नान पुंडलिके वंदन । देखावे चरण विठोबाचे ।।४।। जनार्दनाचा एका पंढरी सांडुनी । न जाय अवनीं कवण तीर्थीं ।।५।। 💦🌺-: भावार्थ :-💦🌺 पंढरी हे भुतलावरील चिरंतन टिकणारे शाश्वत क्षेत्र असून अद्वितीय आहे. येथे पांडुरंग भक्तांची वाट पहात उभा आहे. इतर क्षेत्रीं विधी-निषेधांची बंधन आहेत. पंढरींत केवळ भोळ्या भाबड्या मनाचा भक्तिभाव पुरेसा आहे. तीर्थांत स्नान करून भक्त पुंडलिकाचे दर्शन घ्यावें आणि विठोबाच्या चरणी नतमस्तक व्हावे . एकनाथ महाराज म्हणतात, पंढरी सोडून पृथ्वीवरील कोणत्याही तीर्थक्षेत्रीं जाण्याची ओढ वाटत नाही. 🚩🚩🙏राम कृष्ण हरी 🙏🚩🚩