Posts

Showing posts from January, 2022

हरीचे ते दास । ज्यांचा पंढरीसी वास ।।१।।

Image
🌷🌱अभंग नाथांचे🌱🌷 हरीचे ते दास । ज्यांचा पंढरीसी वास ।।१।। येती नेमें पंढरीसी । दरूशन घेती विठ्ठलासी ।।२।। करिती चंद्रभागे स्नान । पूर्वजा उध्दरतीं जाण ।।३।। करिती गोपाळकाला । गोपाळपुरी मिळोनि मेळा ।।४।। ऐसा जया घडे नेम । एका जनार्दनीं निष्काम ।।५।। 🌺🌾भावार्थ :-🌾🌺 हरीचे दास पंढरीस नित्यनेमाने येऊन विठ्ठलाचे दर्श़न घेतात. चंद्रभागेचे स्नान करुन लाभलेल्या पुण्यफलाने पूर्वजांचा उध्दार होतो. गोपाळपुरीं एकत्र जमून गोपाळकाला करतात. असा नेम ज्यांना घडतो ते भक्त निष्काम कर्मयोगी आहेत असे एकनाथ महाराज म्हणतात. 🚩🙏राम कृष्ण हरी 🙏🚩

न जायेचि ताठा नित्य खटाटोप ।

Image
।। ॐनमो सद्गुरू एकनाथाय नमः।।      🔴अभंग आठरावा🔴 न जायेचि ताठा नित्य खटाटोप । मण्डुकीं वटवट तैसे ते गा ॥ १ ॥ प्रेमावीण भजन नाकाविण मोती । अर्थाविण पोथी वाचुनी काय ॥ २ ॥ कुंकवा नाहीं ठावे म्हणे मी आहेव । भावावीण देव कैसा पावे ॥ ३ ॥ अनुतापेवीण भाव कैसा राहे । अनुभवें पाहें शोधूनियां ॥ ४ ॥ पाहतां पाहणें गेलें तें शोधूनी । एका जनार्दनीं अनुभविलें ॥ ५ ॥ 🌷🌻🍁भावार्थ🍁🌻🌷 (अध्ययनाचे) खटाटोप नेहमी चालू आहेत, पण अंगातील ताठा जर जात नसेल तर अरे, मग ते अध्ययन बेडकाच्या बडबडी प्रमाणेच आहे. ।।१।। प्रेमाशिवाय भजन, नाकाशिवाय मोती व अर्थाशिवाय पोथी वाचणे हे फुकट नाही काय ?. ।।२।। कुंकवाला तर ठिकाण नाही आणि मी सौभाग्यवती आहे असे म्हणते ! आणि तसा भाव तर नाही मग देव कसा प्राप्त होईल?. ।।३।। अनुतापावाचून भाव कसा राहील? हे अनुभवाने तू शोधून पहा. ।।४।। शोध करू गेले असता पाहणारा आणि पाहणे हे दोन्ही जातात. हे मी अनुभवले, असे जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात. ।।५।। 🌼🙏आपला दासानुदास 🙏🌼

काय पद्मनीचे षंढासी सोहळे ।

Image
 श्री संत एकनाथ महाराजकृत                         हरिपाठ 🌾🌺 अभंग सतरावा 🌺🌾 काय पद्मनीचे षंढासी सोहळे । वांझेसी डोहाळे कैची होती ॥ १ ॥ अंधापुढें दीप खरासी चंदन । सर्पासी दुधपान करूं नये ॥ २ ॥ क्रोधि अविश्वासी त्यासी बोध कैंचा । व्यर्थ आपुली वाचा शिणवूं नये ॥ ३ ॥ खळाची संगती उपयोगासी न ये । आपणा अपाय त्याचे संगे ॥ ४ ॥ वैष्णवीं कुपथ्य टाकिल वाळूनी । एका जनार्दनीं तेचि भले ॥ ५ ॥ 🍀🌷🌻🍁 भावार्थ 🍁🌻🌷🍀 नपुंसकाला पद्मिनीचे सोहळे काय? वांज स्त्रीला डोहाळे कुठले होणार? ।।१।। आंधळ्यांपुढे दिवा ठेऊ नये, गाढवाला चंदन लावू नये, सर्पाला दूधपान करू नये. (कारण तसे केले तरी त्याचा त्यांना काय उपयोग ?) ।।२।। जो क्रोधी अविश्वासी आहे त्यास बोध कोठून होणार? म्हणून त्याला बोध करून आपल्या वाणीला शिण देऊ नये. ।।३।। दुष्ट  लोकांची संगती आपल्याला केव्हाही उपयोगी पडणार नाही. उलट त्यामुळे आपला घात मात्र होईल. ।।४।। जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, ज्या वैष्णवांनी असे हे कुपथ्य दूर फेकून दिले तेच शहाणे होत. ।।५।। 🌼🙏आपल...

घडती पुण्याचिया रासी ।

Image
🌾🌱🌾 अभंग 🌱🌾🌱 घडती पुण्याचिया रासी । जे पंढरीसी जाती नेमें ।।१।। घडतां चंद्रभागे स्नान । आणि दरूशन पुंडलिक ।।२।। पाहतां विटेवरी जगदीश । पुराणपुरूष व्यापक ।।३।। वारकरी गायी सदा । प्रेमे गौविंदा आळविती ।। ४ ।। तया स्थळीं मज ठेवा. । आठवा जनीं जनार्दन ।।५।। शरण एका जनार्दन । करा माझी आठवण ।।६।।    💦🌾💦भावार्थ 💦🌾💦 जे भाविक नित्यनेमाने पंढरीची वारी करतात त्यांच्या पुण्याचा राशींनी संचय होतो . या भाविकांना चंद्रभागेचे स्नान घडते, भक्त पुंडलिकाचे दर्शन घडते. चराचरात व्यापलेल्या पुराणपुरुष जगदीशाचे ध्यान याच देही याचडोळां बघावयास मिळतें. वारकरी सतत विठुनामाचा घोष करुन देवाला आळवतात . त्यां पवित्र स्थळीं निवास लाभावा अशी इच्छा व्यक्त करुन एकनाथ महाराज सद्गुरु जनार्दन स्वामींना शरण जातात. 🚩🙏राम कृष्ण हरी 🙏🚩

श्री संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ

Image
।।ॐ नमो सद्गुरू एकनाथाय नमः।।        🔴अभंग सोळावा🔴 कल्पनेपासूनी कल्पिला जो ठेवा । तेणें पडे गोंवा नेणे हरी ॥ १ ॥ दिधल्या वांचूनि फळप्राप्ति कैंची । इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा ॥ २ ॥ इच्छावे ते जवळी चरण हरीचे । चरण सर्व नारायण देतो तुज ॥ ३ ॥ न सुटे कल्पना अभिमानाची गांठी । घेतां जन्म कोटी हरि कैंचा ॥ ४ ॥ एका जनार्दनीं सांपडली खूण । कल्पना अभिमान हरि झाला ॥ ५ ॥ 🍀🌷🌻🍁भावार्थ🍁🌻🌷🍀 कल्पनेमुळे इच्छांचा जो साठा तयार झाला त्यामुळे गुंतडा ( अडथळा) निर्माण होतो, म्हणून हरी जाणला जात नाही. ।।१।। दिल्याशिवाय फळाचा लाभ कसा होणार? हे बाबा ? नुसत्या कल्पनेने इच्छा करीत राहणे फुकट आहे. ।।२।। देवाचे चरण जवळ असावे अशीच इच्छा करावी नारायण तुला सर्व देईल. ।।३।। कल्पना व अभिमानाची गाठ जर सुटली नाही तर कोट्यवधी जन्म घेतले तरी हरीची प्राप्ती कशी होणार? ।।४।। जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, हरीचा जप करणे ही खूण मला सापडली व त्यायोगे माझ्या ठिकाणची कल्पना व अभिमान हरिरुप झाला. ।।५।। 🌼🙏आपला दासानुदास 🙏🌼

श्री संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ

Image
                🔴अभंग पंधरावा🔴 ।।ॐ नमो सद्गुरू एकनाथाय नमः।। एक तीन पांच मेळा पञ्चवीसांच । छत्तिस तत्त्वांचा मूळ हरि ॥ १ ॥ कल्पना अविद्या तेणे झाला जीव । मायोपाधी शिव बोलिजेति ॥ २ ॥ जीव शिव दोन्ही हरिरूपीं तरंग । सिंधु तो अभंग नेणें हरी ॥ ३ ॥ शुक्तीवरी रजत पाहतां डोळां दिसे । रज्जूवरी भासे मिथ्या सर्प ॥ ४ ॥ क्षेत्र-क्षेत्रज्ञातें जाणताती ज्ञानी । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥ 🌷🌻🍁भावार्थ🍁🌻🌷 कोणी म्हणावं संसार एक तत्वाचा, कोणी तीन तत्वाचा, कोणी पाच तत्वाचा, कोणी पंचवीस तत्वाचा व कोणी छत्तीस तत्वाचा आहे. असे मानतात..! परंतु, ह्या सर्व तत्वांचे मूळ एक हरिच आहे. ।।१।। अविद्यारुपी कल्पनेमुळे चैतन्य जीव दशेला प्राप्त होते, आणि मायोपाधीमुळे ते शिव म्हटले जाते. ।।२।। पण जीव व शिव ह्या दोन्ही हरी स्वरूपावरील लाटा आहेत, मूळ समुद्र सारखा हरी अभंगच आहे. आपल्यावर ह्या लाटा उत्पन्न होतात, हे तो जाणतच नाही. ।।3।। शिंपल्याकडे बघतांना डोळ्याला रुप्याचा भास होतो व दोरीकडे बघतांना सापाचा भास होतो. (तसेच हरिस्वरूपाच्या ठिकाणी जीव शिवाचा भा...

श्री संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ

Image
       🔴अभंग चौदावा🔴 ।।ॐ नमो सद्गुरू एकनाथाय नमः।। हरि बोला देतां हरि बोला घेतां । हांसतां खेळतां हरि बोला ॥ १ ॥ हरि बोला गातां हरि बोला खातां । सर्व कार्य करितां हरि बोला ॥ २ ॥ हरि बोला एकांतीं हरि बोला लोकांतीं । देहत्यागाअंतीं हरि बोला ॥ ३ ॥ हरि बोला भांडतां हरि बोला कांडतां । उठतां बैसतां हरि बोला ॥ ४ ॥ हरि बोला जनीं हरि बोला विजनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥ 🍀🌷🌻🍁 भावार्थ🍁🌻🌷🍀 देतांना, घेतांना, हसतांना, खेळतांना हरीचा जप करा. ।।१।। गातांना, खातांना, फार काय, सर्व कामे करतांना हरीचा जप करा. ।।२।। एकांतात, लोकांशी व्यवहार करीत असतांना व देह त्याग करण्याच्या शेवटच्या घटकेला हरी हरी म्हणा. ।।३।। भांडताना, कांडतांना, उठतांना, बसतांना हरी हरी म्हणा. ।।४।। जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, जनात, वनात हरी म्हणा. ।।५।। (तात्पर्य, मनुष्याने सर्वकाळ कोणतेही कार्य करीत असतांना हरी हरी म्हणावे.) 🌼🌻🙏आपला दासानुदास 🙏🌼🌻

श्री संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ

Image
        🔴अभंग तेरावा🔴 ।।ॐ नमो सद्गुरू एकनाथाय नमः।। ओळखिला हरि सांठविला पोटीं । होतां त्याची भेटी दुःख कैंचें ॥ १ ॥ नर अथवा नारी हो कां दुराचारी । मुखीं गातां हरि पवित्र तो ॥ २ ॥ पवित्र तें कुळ धन्य त्याची माय । हरि मुखें गाय नित्य नेमें ॥ ३ ॥ काम क्रोध लोभ जयाचे अंतरीं । नाहीं अधिकारी ऐसा येथें ॥ ४ ॥ वैष्णवांचें गुह्य काढिलें निवडुनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥  🌷🌻🍁 भावार्थ🍁🌻🌷 हरीला ओळखून त्याला आपल्या पोटात साठवले, अशाला हरीची भेट झाल्यावर आता दुःख कुठले. ।।१।। पुरुष असो अथवा स्त्री असो, मग ते दुराचारी का असेनात ! जो मुखाने हरीचा जप करील तो पवित्रच होय. ।।२।। जो नित्य नियमाने मुखाने हरीचा जप करतो त्याचे कुळ पवित्र होय व त्याला जन्म देणारी आईही धन्य होय. ।।३।। ज्याच्या अंतःकरणात काम, क्रोध, लोभादि विकार आहेत असा मनुष्य येथे अधिकारी नाही. ।।४।। जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, हरी स्मरण करणे हे जे वैष्णवांचे गुह्य आहे; ते मी निवडून काढले म्हणून तुम्ही हरी म्हणा..!! 🌻🙏आपला दासानुदास 🙏🌻

नाकळे तें कळे कळे तें नाकळे । वळे तें ना वळें गुरुविणें ॥ १

Image
        🔴अभंग बारावा🔴 🙏।। ॐ नमो सद्गुरू एकनाथाय नमः।।🙏 नाकळे तें कळे कळे तें नाकळे । वळे तें ना वळें गुरुविणें ॥ १ ॥ निर्गुण पावलें सगुणीं भजतां । विकल्प धरितां जिव्हा झडे ॥ २ ॥ बहुरूपी घरी संन्यासाचा वेष । पाहोन तयास धन देती ॥ ३ ॥ संन्याशाला नाहीं बहुरूपियाला । सगुणीं भजला तेथें पावे ॥ ४ ॥ अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥ ५ ॥ 🌷🌻🍁 भावार्थ🍁🌻🌷 हरीला ओळखून त्याला आपल्या पोटात साठवले, अशाला हरीची भेट झाल्यावर आता दुःख कुठले. ।।१।। पुरुष असो अथवा स्त्री असो, मग ते दुराचारी का असेनात ! जो मुखाने हरीचा जप करील तो पवित्रच होय. ।।२।। जो नित्य नियमाने मुखाने हरीचा जप करतो त्याचे कुळ पवित्र होय व त्याला जन्म देणारी आईही धन्य होय. ।।३।। ज्याच्या अंतःकरणात काम, क्रोध, लोभादि विकार आहेत असा मनुष्य येथे अधिकारी नाही. ।।४।। जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, हरी स्मरण करणे हे जे वैष्णवांचे गुह्य आहे; ते मी निवडून काढले म्हणून तुम्ही हरी म्हणा..!!

एकाएकीं आतां असावेंसें वाटे।

Image
🚩🕉️‼️श्री विठ्ठल‼️🕉️🚩     💦🌺 अभंग 🌺💦 एकाएकीं आतां असावेंसें वाटे। तरिच हे खोटे चाळे केले।।१।। वाजवूनि तोंड घातलें बाहेरी। कुल्प करूनी दारीं माजी वसा।।२।। उजेडाचा केला दाटोनि अंधार। सवें हुद्देदार चेष्टविला।।३।। तुका म्हणे भय होतें तोंचि वरी। होती कांही उरी स्वामिसेवा।।४।। 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷      भावार्थ.. हे देवा, आतां तुम्हांला एकटे असावेंसें वाटतें म्हणूनच तुम्ही हा फसविण्याचा खोटा मार्ग स्वीकारला.      देव निराकार आहे असें तुम्हीं आपले वेदमुखानें सांगून आम्हांला सगुण कल्पनेच्या बाहेर घालविलें आणि मायेचें कुलूप दारास लावून तुम्ही आंत लपून बसतां.      तुमचे घरांत ज्ञानदीपाचा प्रकाश होता तो तुम्ही मुद्दाम घालवून अज्ञान अंधकार पाडला व आमचे बरोबर (संसारी जीवांबरोबर संतरूपी हुद्देदार किंवा) वेद हा हुद्देदार व्यवहार करावयास लावला, विधिनिषेधाचे नियम करते झालां. तुकाराम महाराज म्हणतात, तुमचें आमचें स्वामिसेवकपणाचें नातें जोंपर्यंत होतें तोंपर्यंत आम्हीं तुमचें भय धरलें (आतां तुम्हीं-आम्हीं एकरूप झाल्यानंतर भयाचें कार...

कुटुंबाचा केला त्याग|

Image
🌷 *सार्थ तुकाराम गाथा*🌷 -----------------^---------‐--------- कुटुंबाचा केला त्याग| नाही राग जव गेला||१|| भजन ते ओंगळवाणे| नरका जाणें चुकेना||२|| अक्षराची केली आटी| जरी पोटी संतनिंदा||३|| तुका म्हणे मागे पाय| तया जाय स्थळासी||४|| """""""""""""""""""""""""""""""""""" भावार्थ:- जोपर्यंत विषयांची आसक्ती गेली नाही. तोपर्यंत स्त्री-पुत्रदिकांचा त्याग केला, तरी त्याला काहीच अर्थ नाही.एखादा दुराचरणी हरिभजन करीत असला तरी त्याचे ते भजन पाप मिश्रित असल्यामुळे वाईटच होय.म्हणून त्यायोगे त्याचे नरकाला जायचे चुकणार नाही. वेद,शास्त्रे,पुराणे, किंवा संतवचने घोकण्याचे पुष्कळ श्रम केले. पण अंतःकरणात संतांविषयी तिरस्कार असेल तर ते सर्व व्यर्थ होय. म्हणुन जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात वर सांगितलेल्या प्रकारचे लोक मेल्यानंतर ज्यांचे उलटे पाय आहेत. अशा असुरी योनीला प्राप्त होतात की ज्या योनीत हरिप्राप्तीच्या मार्गा...

अबोल्याने ठेला तुका |

Image
‼️सार्थ तुकाराम गाथा ‼️ -------------------^----------------‐- निघाले तें अंगीहूनि | आतां झणी आतळे||१|| पळवा परपरते दुरी | आता हरी येथूनि ||२||  धरिले तैसे श्रुत करा हो | येथे आहो प्रपंची||३||   अबोल्याने ठेला तुका | भेउनि लोका निराळा||४|| """"""""""""""""""""""""""""""""""""""" भावार्थ:- माझ्या अंगातील सर्व विकार नाहीसे झाले.आता ते पुन्हा मला स्पर्श करतील असे काही घडू देऊ नकोस म्हणजेच संसाररूपी अग्नीतून बाहेर पडलेल्या मला पुन्हा त्या आगीची झळ बसू देऊ नका.हरी,आता ते दुःख पळवून लावा. जे माझ्या मनात आहे ,तेच कानावर पडू द्या. आम्ही तर प्रपंचातच आहोत. देवा तुम्ही तुमचे पतितपावन हे नाव सार्थ करा आणि माझा उद्धार करा.मी अखंड हरिचिंतन करीत राहील म्हणुन जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मी या लोकांना भिऊन त्यांच्यापासून निराळा राहिलो आहे . 🚩 राम कृष्ण हरि 🚩

देखावे चरण विठोबाचे ।

Image
अविनाश क्षेत्र पंढरी सर्वथा । आणीक ती वार्ता न ये मना ।।१।। सर्व तीर्थ मार्ग विधियुक्त आहे । येथें उभा पाहे पांडुरंग ।।२।। आटणी दाटणी मुंडणी सर्वथा । नाहीं पै तत्वतां यया तीर्था ।।३।। करावें तें स्नान पुंडलिके वंदन । देखावे चरण विठोबाचे ।।४।। जनार्दनाचा एका पंढरी सांडुनी । न जाय अवनीं कवण तीर्थीं ।।५।। 💦🌺-: भावार्थ :-💦🌺 पंढरी हे भुतलावरील चिरंतन टिकणारे शाश्वत क्षेत्र असून अद्वितीय आहे. येथे पांडुरंग भक्तांची वाट पहात उभा आहे. इतर क्षेत्रीं विधी-निषेधांची बंधन आहेत. पंढरींत केवळ भोळ्या भाबड्या मनाचा भक्तिभाव पुरेसा आहे. तीर्थांत स्नान करून भक्त पुंडलिकाचे दर्शन घ्यावें आणि विठोबाच्या चरणी नतमस्तक व्हावे . एकनाथ महाराज म्हणतात, पंढरी सोडून पृथ्वीवरील कोणत्याही तीर्थक्षेत्रीं जाण्याची ओढ वाटत नाही. 🚩🚩🙏राम कृष्ण हरी 🙏🚩🚩

वेचावें तें जीवें।

Image
तुका म्हणे...      वेचावें तें जीवें।      पूजा घडे ऐशा नांवें।।१।।      बिगारीची ते बिगारी।      साक्षी अंतरींचा हरी।।२।।      फळ बीजाऐसें।      कार्यकारणासरिसें।।३।।      तुका म्हणे मान।      लवणासरिखें लवण।।४।। 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 भावार्थ:- आपला जीव देवाला समर्पण करणें ह्याचें नांव देवपूजा.      ह्यावांचून सर्व करणें बिगारीचें होतें. ह्यास अंतरसाक्षी हरि आहे.      जसें बीज तसें फळ प्राप्त होतें व कारणासारखें कार्य साध्य होतें.      तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या अंगीं जशी नम्रता असेल तसा देव त्याच्या ठिकाणीं नम्र होऊन त्याला मान देतो (मिठाचें कार्य खारटपणा आणणें, त्याप्रमाणें आपली पूजा जशी असेल तसें फळ मिळतें). 💥💥💥💥💥💥💥💥💥💥    ⛳🙏🏻 राम कृष्ण हरि🙏🏻⛳     💐🙏🏻 पांडुरंग हरि🙏🏻💐

आतां झालों उतराई।

Image
🚩🕉️‼️श्री विठ्ठल‼️🕉️🚩            🌺🌺 अभंग🌺🌺 तुका म्हणे.. मजपुढें नाहीं आणीक बोलता। ऐसें कांहीं चित्ता वाटतसे।।१।। याचा कांहीं तुम्हीं देखावा परिहार। सर्वज्ञ उदार पांडुरंगा।।२।। कामक्रोधें नाहीं सांडिलें आसन। राहिले वसोन देहामध्यें।।३।। तुका म्हणे आतां झालों उतराई। कळों यावें पायीं निरोपिलें।।४।। 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷      भावार्थ:- माझ्याप्रमाणें बोलका प्राणी कोणी नाहीं असें जें कांहीं माझ्या चित्तास वाटत आहे.      तें नाहींसें करण्याचा हे पांडुरंगा, तुम्ही कांहीं विचार पाहा. तुम्ही सर्व जाणणारे उदार आहां.      माझ्या देहाचे ठिकाणीं काम-क्रोधांनीं वास्तव्य केलें आहे. ते तें आसन सोडून कोठें जात नाहींत.      तुकाराम महाराज म्हणतात,माझ्या अंत:करणाची जी स्थिती आहे ती तुमचे पायांजवळ ठेवून मी उत्तीर्ण झालों आहें हें आपल्याला कळावें.    ⛳🙏🏻राम कृष्ण हरि🙏🏻⛳

भीष्मपण केला खरा ।

Image
तुका म्हणे - साधावया भक्तीकाज । नाहीं लाज हा धरीत ।।१।।  ऐसियासी शरण जावें ।  शक्ती जीवें न वंची ।।२।।  भीष्मपण केला खरा ।  धनुर्धरा रक्षीलें ।।३।।  तुका म्हणे साक्ष हातीं ।  तो म्यां चित्तीं धरियेला ।।४।। अर्थ - भक्तीला सहाय्य होण्याकरिता आणि भक्तांचे रक्षण करण्याकरिता हा देव मनात कसलीही लाज धरत नाही. ।।१।। जो पूर्ण शक्तीनिशी आपले रक्षण करतो अशा त्या देवाला आपण शरण जावे. ।।२।। पहा ना ! त्या देवाने भीष्माची प्रतिज्ञाही खरी केली आणि धनुर्धर अर्जुनाचेही रक्षण केले. (परस्परविरोधी गोष्टी एकाच वेळी खऱ्या करून दाखवल्या.) ।।३।। तुकोबा म्हणतात, भक्ताचे रक्षण करण्याकरिता देव कसलाही विचार करत नाही याबद्दल असलेली संतांची साक्ष माझ्या समक्ष आहे. त्यामुळे मी निःशंकपणे त्या देवाला मनात धारण केले आहे. ।।४।। ।राम कृष्ण हरि।